Follow me on Twitter- https://twitter.com/doc_chinmay

Wednesday, August 6, 2008

शिवरायांबद्दल परदेशी इतिहासकारांनी काढलेले उद्गार



शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अनेक परदेशी इतिहासकारांनी आढावा घेतला.काही शिवकालीन होते तर काही नंतरचे होते.यांनी शिवरायांच्या कार्याचे कशा पध्दतीने अवलोकन केले आहे यातुन परदेशी लोक शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करतात हे दिसुन येते. त्यापैकी काही उद्गारांचे भाषांतर करत आहे.

Thevenot म्हणतो-शिवाजी राजांचे डोळे तीक्ष्ण होते,आणि त्यातुन असामान्य बुध्दिमत्ता दिसुन येत असे.राजे दिवसातुन एकदाच जेवण करतात आणि ते निरोगी आहेत.

Cosmo Da Guarda म्हणतो-शिवाजी राजांच्या कृतीत धडाडी होतीच पण त्याचबरोबर त्यांच्या आचरणात्,चालीत एक जिवंतपणा व उत्साह होता.त्यांचा चेहरा स्वच्छ आणि गोरा होता,निसर्गाने त्यांना सर्वोत्तम गुण दिले होते मुख्य म्हणजे त्यांचे काळे डोळे ज्यातुन जणुकाही अग्निज्वाळा येत असत्,आणि याला जोड होती तीव्र्,तीक्ष्ण बुध्दिमत्तेची.

Orme म्हणतो-शिवाजी महाराजांकडे एका यशस्वी सेनापतीचे सर्व गुण होते.सैन्याचा प्रमुख म्हणुन त्यांनी जितके जमिनीवर जितके अंतर पार केले तितके दुसर्‍या कुठल्याही सेनापतीने केले नसेल.आणीबाणीचा प्रसंग कितीही आकस्मिक अथवा मोठा असला तरीही शिवाजी राजांनी त्याचा विवेकाने व धैर्याने त्वरीत यशस्वीपणे सामना केला.

General Sullivan म्हणतो-ज्या संत्रस्त काळात शिवाजी महाराज रहात होते त्या काळात सफल होण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक गुण त्यांच्यामधे होता.ते सतर्क होते आणि त्यांची कृती प्रखर व धाडसी असे.त्यांच्यातील सहनशीलता,उर्जा आणि निर्णयक्षमतेमुळे कुठल्याही काळात त्यांच्याकडुन गौरवास्पद कार्य झाले असते.तो एक हिंदु राजा होता ज्याने आपल्या देशी घोड्यांच्या सहाय्याने प्रचंड मुघल घोडदळाला पाणी पाजले.त्यांचे मावळे गनिमी काव्यामुळे त्याकाळातले जगातील सर्वात चांगले पायदळ होते

J. Scott म्हणतो-शिवाजी राजे एक योध्दा म्हणुन असामान्य होते,राज्यकर्ता म्हणुन निपुण होते तर सद्गुणी लोकांचे मित्र होते.त्यांनी हुशारीने आपली धोरणे आखली तर दृढतेने ती अमलात आणली.कोणीही कधीही त्यांच्या ध्येयाबद्दल अवगत नसे तर प्रत्येक जण त्या ध्येयाच्या पुर्तीबद्दल अवगत असे.

Douglas म्हणतो-कुठल्याही आणीबाणीच्या समयाच्या वेळी सजग राहुन शिवरायांनी त्याला तोंड दिले.या कलेमध्ये त्यांच्या करंगळीत जेव्हढ होत तेव्हढ औरंगजेबाच्या पुर्ण शरीरात नव्हता.जणुकाही शिवाजी राजे एक डोळा उघडा ठेवुनच झोपत.त्यांनी आपल्या जादुई स्पर्षाने आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाने त्यांच्या गरीब्,आज्ञाधारक,दैववादी महाराष्ट्रातील जनतेला अलौकीक कृत्ये करण्यास प्रेरीत केले.ही जनता सर्वोत्तम सैनिक्,पक्के सरदार्,कुशल राजनिती विशारद बनली जिने शेकडो युध्दे जिंकलेल्या मुघलांचा सामना केला.

Abbe Carre म्हणतो-शिवाजी राजे पुर्वेने पाहिलेल्या सर्वोत्तम योद्ध्यांपैकी एक आहेत.त्यांच्या धाडसीपणामुळे ,त्यांच्या युध्दातील चपळाईमुळे व इतर गुणांमुळे त्यांची तुलना स्विडनच्या महान राजा ऍडॉल्फसशी होउ शकते.त्यांच्या जलद गतीने आणि दयाशीलतेने ज्युलियस सीझरप्रमाणे त्यांनी त्यांच्या शत्रूंचीही मने जिंकली ,जे शत्रु त्यांच्या शस्त्रांमुळे दहशतीत होते.

Dr. John F. G. Careri ( 1695 A. D. ) म्हणतात-हे शिवाजी राजे इतके बलाढ्य आहेत की ते एकाच वेळी प्रचंड मुघलांबरोबरही लढतात आणि पोर्तुगिजांबरोबरही लढतात. ते रणांगणावर ५०००० घोडे आणतात आणि त्याहुनही जास्त पायदळ आणतात.त्यांचे सैनिक मुघलांपेक्षा कितीतरी चांगले आहेत. हे सैनिक अतिशय थोड्या अन्नावर दिवस काढतात तर मुघल बायका,विविध साधनसामग्री,तंबु घेउन जातात जणुकाही ते एक चालत फिरत शहरच असत.

Daughlas म्हणतो-शिवाजी महाराज खडकांमधे रहात.त्यांची शक्ती म्हणजे डोंगर दर्‍या होत्या.हा किल्ल्यांमधला माणुस होता ज्याचा जन्मही किल्ल्यामधे झाला होता.किल्ल्यांनी त्याला बनवल आणि त्यानी किल्ल्यांना बनवल.हे किल्ले म्हणजे भारताची दहशत होती,शिवरायांच्या राज्याचे उगमस्थल होते,त्यांच्या युध्दांचा आधार होते,त्यांच्या ध्येयांच्या पायर्‍या होते,त्यांचे घर आणि आनंद होते.त्यांनी अनेक किल्ले बांधले आणि सर्व किल्ले त्यांनी बळकट केले.ही फारच कृपेची गोष्ट होती की शिवाजी राजे दर्यावर्दी नव्हते.नाहीतर जमिनीप्रमाणे समुद्रावरही त्यांनी वर्चस्व गाजवले असते जे वर्चस्व त्यांनी जवळजवळ प्रस्थापित केले होते.त्यांना समुद्र आवडत असे पण समुद्राला ते आवडत नसत.त्यांचे खार्‍या पाण्यावर इतके प्रेम होते की असे म्हणतात की त्यांनी सिंधुदुर्ग बांधताना स्वतःच्या हातानी हातभार लावला होता.त्यांच्या पावलांचे ठसे अजुनही तिथे दाखवता येतात्,काळाच्या वाळुत नाही तर ठोस खडकात.

Da Guarda म्हणतो-शत्रुमध्ये असा दृढ विश्वास निर्माण झाला होता की शिवाजीराजे सगळीकडे आहेत.ते एकाच वेळी अनेक ठिकाणि चढाई करत असत आणि सर्वच ठिकाणी सैन्याचे नेत्रुत्व तेच करत असत.ह्या प्रश्नाला अजुनही उत्तर मिळालेले नाही की शिवाजी राजे स्वतःच्या नावानी दुसर्‍या कुणालातरी पाठवत असत का त्यांना जादु टोना येत असे का स्वतः सैतान त्यांच्या जागी कार्यरत होता.

Sir E. Sullivan म्हणतात-शिवाजी राजे हिंदु इतिहासातील सर्वोत्कृष्ठ राजकुमार आहेत.त्यांनी आपल्या ज्ञातीचा पुरातन गौरव वापस आणला जो अनेक शतकांच्या पराधिनतेमुळे नष्ट झाला होता.आणि मुघल साम्राज्याच्या परमोच्च बिंदुला त्यांनी आपले साम्राज्य बनवले,वाढवले जे की हिंदुस्तानातील मुळ लोकांनी काढलेले आत्तापर्यंतचे सर्वश्रेष्ठ साम्राज्य आहे.

Kincaid म्हणतो-शिवाजी राजे हे मराठा देशाचे मुक्तिदाते होते,त्यांचे गुण विभिन्न होते,जीवन नियमीत होते,स्वभाव सहनशील होता त्यामुळे यात काही आश्चर्य नाही की त्यांचे लोक त्यांना त्यांच्यापैकी एक न मानता त्यांना देवाचा अवतार मानतात.ज्याप्रमाणे अथेन्सचे रहीवासी त्यांचे साम्राज्य लयास जाउन भरपुर कालखंड गेला असुनही भक्तीभावाने Theseus चे पुजन करतात त्याचप्रमाणे मराठे ,शिवरायांच साम्राज्य संपुन भरपुर काळ लोटला तरी अजुनही राजगड्,मालवण मधे त्यांचे पुजन करतात.

Elphinstone म्हणतो-शिवाजी राजांसारखा प्रतिभासंपन्नच औरंगजेबाच्या चुकांचा फायदा उठवु शकतो त्यानंतर धर्मासाठी प्रेरीत करु शकतो व यातुन मराठ्यांमधे राष्ट्राभिमान जाग्रुत करु शकतो.या भावनांमुळे त्यांचे साम्राज्य अशक्त हातांमधे गेल्यानंतरही तग धरुन होते आणि अनेक अंतर्गत समस्या असुनही भारताच्या एका मोठ्या भागावर त्याने नंतर प्रभुत्व निर्माण केले.

Owen म्हणतो-वीरता,देशाभिमान्,धर्माभिमानाची प्रभावळ त्यांच्या(जनतेच्या) कार्यवाहीत होती ज्यातुन ते प्रेरीत झाले.त्यामुळे शहाजी राजांच्या पुत्रास ते पुर्वनिश्चित,दैविक कृपापात्र मुक्तिदाता मानत होते.त्यामुळे शिवाजी राजे व त्यांचे अनुयायी असे मानु शकतात व मानत की त्यांच्या पध्दतीने मुस्लिमांबरोबर केलेल्या युध्दामुळे ते देवासाठी व मनुष्यासाठी एक चांगले कृत्य करत आहेत.ज्यामुळे त्यांचा गौरव झाला,त्यांचे फक्त स्वागतच झाले नाही तर प्रशंसनिय रीत्या प्रतिकात्मक लाभही झाला.

टिप्-मुळ इंग्रजीतील वाक्यांमधे Shivaji असा उल्लेख आहे.त्याचे शब्दशः भाषांतर केल्यास शिवाजी असा एकेरी उल्लेख येतो.वाचनकर्त्यांच्या सोईसाठी वर शिवाजी महाराज्,शिवाजी राजे व शिवराय असे शब्द वापरले आहेत.वाक्यांचे शब्दशः भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आहे पण हा माझा पहीला अनुवाद असल्याने काही चुका असण्याची शक्यता आहे.त्याबद्दल क्षमस्व. सर्व परदेशी लोकांच्या उद्गारांनंतर शेवटी एक भारतीयाने काढलेले उद्गार देतो.

कविराज भूषण म्हणतो-जंभासुरला जसा इंद्र , समुद्राला जसा वाडवाग्नी,गर्विष्ठ रावणाला ज्याप्रमाणे प्रभुराम, मेघाला ज्याप्रमाणे वादळ,मदनाला जसे शिव शंकर, सहस्रार्जुनाला ज्याप्रमाणे परशुराम,वृक्षाना ज्याप्रमाणे वणवा, हरिणांना जसा चित्ता,अंधाराला जसा प्रकाश, कंसाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण,त्याचप्रमाणे नरसिंह असणारे शिवराय म्लेंच्छांचा नाश करतात

37 comments:

Anonymous said...

छान चिन्मय,
छान माहिती गोळा केलीस

Chanakya said...

chaan information. pan mala sinhagadchi awastha pahun aativ dukkha hota.. shiv-rayancha itihas aani kartabgari napolean la pan lajvel, pan mala aaj chya rajya kartyanchi laaj wat-te. mala saang, maharajanchi bhavani talwar ajun london madhe kay karat aahe??

Unknown said...

चिन्मय,
फारच छान. तुझ्या लेखाला मोठया प्रमाणावर प्रसिध्दी मिळायला पाहीजे.

Unknown said...

ekdum masta
tuzi hi sarva mahiti saamana madhe chapun aali pahije....

Anonymous said...

chanach kam kela aahes mitra.....actully ha lekh jastit jasta lokanparyanta pochla pahije ..

Unknown said...

chnimay apan kharech khup khup ullekhaniya kam kele ahe aai jagadamba aaplya karyala ghavghavit yash devo

jay shivaji jay bhavani

Dhananjay Raje sarade

Anonymous said...

chinmay atishay uttam lekh ahe,tu nehmich abhyaspurna articles takat astos,tya baddal abhari ahe,aamhal suddha kahi navin mahiti milat rahate,keep posting.

siddhesh

Anonymous said...

chinmay
'kharach khup abhyaspurvak blog lihila aahes...punha ekda chan lihiles mhanun abhinanadan

Anonymous said...

खूप छान माहिती दिली आहे,
धन्यवाद...


Priyal Vedpathak

Anonymous said...

मिर्झा राजे जयसिंग ह्यांच्या सोबत असलेले इटालियन ( रोम देशीचे राहणारे) तोफखाना तद्न्य
निकोलाओ मनुची ह्यांनी मिर्झा राजांच्या महाराष्ट्र स्वारी च्या वेळीचे साद्यांत लेखन अन् आठवणी लिहील्याचे ऐकिवात होते...
ते कुठे मिळू शकतील का चिन्‍मयजी?
त्या वर्णनात थोरले राजे जेव्हा पुरंदर च्या पायथ्याशी मिर्झाना भेटायला गेले होते तेव्हाच सटिक वर्णन आहे असे म्हणतात...
तुमचा व्यासंग पाहता तुम्ही ते मिळवून वाचकांना उपलब्ध करवुन दिल्यास "बेस होईल" असे आम्हास वाटते..

वंदे मातरम्

Anonymous said...

good
keep it up


Amol D.

Anonymous said...

mast.

onkar

Anonymous said...

HEY BRO U DID VERY NICE WORK
JAY BHAVANI JAY SHIVAJI

Dr. DeePe$H

Anonymous said...

excellent collection..


Shailendrasingh

Anonymous said...

चिन्मय
हा लेख जास्तीत जस्ता लोकंपर्यनता पोह्च्न्या साठी याचे मूळ इंग्रजी मधील लेख नेशनल लेवल कम्युनिटी वर पोस्ट करावेत ही विनंती ..
जय भवानी !! जय शिवाजी !!

Anonymous said...

Good one


yogesh

Anonymous said...

Chinmay
Khup changali aani chhati bharun yenari mahiti aahe

Swapnil

Shailendra said...

इतकी चांगली माहिती संकलित कुठून केलीत हो?
शिवरायांचे संपुर्ण व्यक्तिचित्र यातुन प्रकट होते. असली अमुल्य माहिती पुरवल्याबद्द्ल धन्यवाद.

Unknown said...

hey dude, u have done a great job..
its very nice info for all of us..
please keep it up/...
Shivrayache athvave rup, athvava pratap..
shivcharitra dolyasamor ubhe rahile.. shivay bhashahi khup sahaj ani samajnyas sopi aahe..
Shivaji maharaj ki jai...

Anonymous said...

Good work, gr8 collection!!! Thanx buddy

Saurabh

Anonymous said...

Good Job Chinmay
Keep it up.

Ravindra

Anonymous said...

Very very good information
ajun kahi vishar asatil tar sang.



Parag

Anonymous said...

Very good info.
Thanks for sharing.


Sudarshan

Omkar Darvekar said...

Chimya.. I read almost all your blogs and I am kind of fan of ur writting.. but let me tell u something; this is one of the most boring blogs written by you. You have a good writting skill backed by a incisive analytical ability. You provide good hypothesis and u try to reach to certain conclusion. Now one more nice thing is you don't force ur conclusion. What does this all say? it says u r a thinker. What Shivaji realy needs is someone who does objective thinking on his life and work and present it. My point is that this writting seem to have come from fan of shivaji, i want to read something coming from the follower of shivaji. Kadachit tu faar kashta hi ghetale nasatil pan ghetale asatil tar te vyartha ahet, karan shivajicha mahatva ata sangayachi garaj urali nahiye, shivaji angat utaravayachi garaj ahe. shambhar pustaka vachun ata mala he lekh bore hotat mhanun mi mhanalo one of the most boring blog.

Anonymous said...

mazing job ... dhanya zalo tumcha blog wachun ...
thnx a lot man

vishal deshmukh

ऋयाम said...

far chan lihila ahes Chinmay.
ya blog baddal mhatla tar mahiti gola (karne jhale, pan tarihi..)
Shivarayanbaddalcha abhimaan ajun jast wadhla!

tujhe ajun 2-3 blogs suddha wachale.
asach lihit ja. khup changle ahet.

Dipaswini Parab said...

Kupach surekh

ब्रम्हज्ञान said...

याचे मूळ इंग्रजी मधील लेख कुठे मिळू शकतील का चिन्‍मयजी?

Abhi said...

हे तुम्ही खूप छान काम केले आहेत.
खूप खूप धन्यवाद!!!

आपला नम्र,
अभी

Vijay Randhaye said...

हे तुम्ही खूप छान काम केले आहेत.
खूप खूप धन्यवाद!!!

Unknown said...

Nice work, Chinmay!! I really appreciate your hardwork!

Sarang Madgulkar

Unknown said...

khup chhan aahe ..

omprakash said...

very very nice ...
mala tumcha anuvad far aavdala...
aapan aratim anuvad kartat ...
ek sachacha marathi aslyane mala abhiman aahe tumcha ki tumchya mule aamcya sarkhya na ase durmil anuvad vachayala bhetale ..........

omprakash kawale

Anonymous said...

छान माहिती गोळा केलीस,चिन्मय!
तुझ्या लेखाला मोठया प्रमाणावर
प्रसिध्दी मिळायला पाहीजे
ha lekh jastit jasta
lokanparyanta pochla pahije ..ya sathi mi chotasa prayatna kelay,to lekh mi tuja reference devun add kelay majya orkut communityt,tula tasa kel tar awdel ka?

Unknown said...

tumhi farch sundar mahiti jamvlii aahet khup chagle kam please continue this work

Dr.Chinmay Kulkarni said...

viki,dhanyavaad.maajhi tase karanyaalaa kaahich harkat naahi

kishor kalambe ( Umarath) said...

mitra khup chan mahiti jama keles tila khup prasiddhi milayla havi